रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. खेळाडूंना आता प्रत्येक सामना खेळण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत.

रणजी ट्रॉफीच्या आगामी सिझनपासून खेळाडूंना दुप्पट मोबदला मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून याला दुजोरा मिळाला आहे.

एमसीएने बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना दिलेली मॅच फी रणजी खेळाडूंच्या बरोबरीने करण्याचा निर्णय घेतलाय.

पुढच्या सिझनला मुंबईच्या रणजी खेळाडूंची कमाई दुप्पट होणार आहे.

यामध्ये अनुभवी खेळाडूला 1.2 लाख रुपये मिळतील.

एमसीएने घेतलेल्या निर्णयामुळे आतापर्यंत मुंबईच्या ज्या खेळाडूला सामन्यामागे 2.40 लाख रुपये मिळत होते, त्याला पुढील सिझनपासून 4.80 लाख रुपये मिळतील.

एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक म्हणाले की, बीसीसीआयकडून देण्यात येणाऱ्या मानधनासह तरुण क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यात येणार आहे

VIEW ALL

Read Next Story