पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे औपचारिक निषेध नोंदवलाय.

भारतात सुरू असलेला क्रिकेट विश्वचषक कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात विलंब झाला असल्याची तक्रार पीसीबीकडून करण्यात आली आहे.

पीसीबीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसासाठी होणारा विलंब आणि चाहत्यांना नाकारण्यात आलेला व्हिसा, यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे औपचारिक निषेध नोंदवला.

भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघासोबत झालेल्या अनुचित वर्तनाबद्दलही पीसीबीनं आयसीसीकडे तक्रार केली आहे

14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या लढतीसाठी फक्त एक ते दोन पाकिस्तानी पत्रकार उपस्थित होते.

या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. 7 विकेट्सने टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवलाय.

VIEW ALL

Read Next Story