90 वर्षात पहिल्यांदाच रणजी विजेत्याला मिळालं एवढं मोठं बक्षीस; 'मुंबई'ला मिळाले 'इतके' पैसे

42 व्यांदा जेतेपदावर नाव कोरलं

मुंबईच्या संघाने गुरुवारी (14 मार्च 2024) रोजी 42 व्यांदा रणजी (2023-24) जेतेपदावर नाव कोरलं. विदर्भाच्या संघाने मुंबईला कडवी झुंज दिली. मात्र मुंबईने 169 धावांनी विजय मिळवला.

मुंबईचा संघ मालामाल

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मिळावलेल्या या विजयामुळे मुंबईचा संघ मालामाल झाला आहे.

शेवटच्या दिवशी विजय

90 व्या रणजी स्पर्धेमधील आपली 48 वी फायनल खेळणाऱ्या मुंबईने शेवटच्या दिवशी विजय मिळवला.

सर्वाधिक रक्कम बक्षिस म्हणून दिली

रणजी जिंकणाऱ्या संघाला पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सर्वाधिक रक्कम बक्षिस म्हणून दिली गेली.

त्या निर्णयानंतरची पहिलीच स्पर्धा

बीसीसीआयने रणजी विजेत्या टीमच्या बक्षीसाची रक्कम 2 कोटींवरुन 5 कोटी केल्यानंतरची ही पहिलीच स्पर्धा होती.

बक्षिस म्हणून मिळाली सर्वाधिक रक्कम

त्यामुळे मुंबईला रणजीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम म्हणजेच 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाली आहे.

बक्षिसांची रक्कम दुप्पट

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही रणजी जिंकणाऱ्या संघाला दिल्या जाणाऱ्या बक्षिसांची रक्कम दुप्पटीने वाढवली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार?

नव्या निर्णयानुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडूनही मुंबईच्या संघाला 5 कोटींचं बक्षीस दिलं जाणार आहे.

संघ झाला 10 कोटींचा मालक

त्यामुळेच ही एक स्पर्धा जिंकून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने तब्बल 10 कोटी रुपये बक्षिस स्वरुपात जिंकले आहेत.

VIEW ALL

Read Next Story