मुलींनी लग्नानंतर अजिबात करु नये 'या' चुका


लग्न हे मुलीसाठी नवं आयुष्य असतं. तिच्यासाठी केवळ घरच नव्हे तर अनेक गोष्टी बदलतात.


नव्या घरात जागा बनवण सोपं नसतं. अशावेळी तुमच्या छोट्या छोट्या चुका महागात पडू शकतात.


लग्नानंतर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊया.


काही मुली सासरी गेल्यावर इतक्या व्यस्त होतात की माहेरच्यांशी बोलायलादेखील त्यांना वेळ नसतो.


तुम्ही घर सोडून गेल्यावर आई-वडील एकटे पडतात. अशावेळी तुम्ही त्यांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.


लग्नाआधी लेट नाईट पार्टी, दारु पिणे अशा सवयी असतील तर त्या नियंत्रणात किंवा बंद करायला हव्यात.


नोकरी करत असाल तर विकेंडला सासु-सासऱ्यांसाठी वेळ काढा.


लग्नाआधी तुमची आई सारे काम करत होती. आता तुम्ही नोकरी करत असाल शक्य नाही पण थोडा वेळ काढून घरच्यांना कामात मदत करा.


लग्नानंतर तुमचे उशीरा येणे सासरच्यांना आवडणार नाही. उशीर होणार असेल तर तसे आधी कळवा.

VIEW ALL

Read Next Story