'या' फळाची पाने आहेत खूपच उपयुक्त, तोंड येण्याची समस्या लगेच दूर होईल

डाळिंब हे शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

डाळिंबाचा रस किंवा फळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

डाळिंबाच्या झाडातील पानांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आणि जीवनसत्त्वे आढळून येतात.

डाळिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.

डाळिंबाची पाने दिसायला लहान असली तरी त्याच्या पानांचा रस औषध म्हणून तोंड आलेल्या व्यक्तीला दिला जातो.

ग्रामीण भागात तोंड आलेल्या व्यक्तीला बरे होण्यासाठी डाळिंबाची पाने खायला सांगितली जातात.

डाळिंब खाल्ल्याने आतड्याचे आरोग्य सुधारते.

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story