शतपावली

जेवणानंतर किती वेळ शतपावली करावी?

झोपणं टाळा

जेवणानंतर लगेचच झोपणं टाळा. हे शरीरासाठी चांगलं नाही.

सवय मोडू नका

जेवल्यानंतर काही वेळ चालणं कधीही फायद्याचं. त्यामुळं ही सवय मोडू नका. पण नेमकं किती वेळ शतपावली करावी हे माहितीये?

पचनक्रीया

जेवणानंतर तुम्ही किमान 20 मिनिटं शतपावली करावी. असं केल्यानं अन्नपदार्थांची पचनक्रीया सुरळीत आणि सोपी होते.

वजनही नियंत्रणात

शतपावलीमुळं पचनक्रिया अगदी योग्य काम करते. याशिवाय वजनही नियंत्रणात राहतं.

रोगप्रतिकारक शक्ती

जेवणानंतरच्या शतपावलीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

मानसिक ताण

नैराश्य, तणाव आणि तत्सम मानसिक ताण कमी होतो. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story