संजय लिला भन्साळी यांना सारखा राग का येतो? शेखर सुमनने सांगितलं कारण

हीरामंडी

संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेबसिरीज 1 मे पासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भन्साळींचा राग

संजय लीला भन्साळी यांच्या रागाचा प्रत्यय अनेक कलाकारांना आला आहे. रणबीरपासून ते सलमानपर्यंत अनेक कलाकारांनी भन्साळींचा राग सहन केलाय.

शेखर सुमन

पण संजय लीला भन्साळी यांना राग का येतो? यावर शेखर सुमन यांनी खुलासा केला आहे. शेखर हीरामंडीमध्ये सहाय्यक भूमिकेत आहेत.

काम करताना राग व्यक्त करण्याचा संपूर्ण अधिकार संजय लिला भन्साळी यांना आहे, असं शेखर सुमन यांनी म्हटलं आहे.

परफेक्शनिस्ट

तो वेडा माणूस नाही तर परफेक्शनिस्ट आहे. जेव्हा एखादा व्यक्ती परफेक्ट असतो तेव्हा तो शॉर्ट टेम्पर्ड देखील असतो. त्याला कामात उत्तम हवं असतं, असं शेखर सुमनने म्हटलं आहे.

अध्ययन सुमन

शेखर सुमन यांच्या मुलाने म्हणजेच अध्ययन देखील यावर खुलासा केला. मी तर शुटिंगच्या एक दिवस आधी स्वत:ला बाथरुममध्ये लॉक करून घेतलं होतं, असं तो म्हणतो.

सलमान ते रणवीर

रणबीर कपूर, सलमान खान, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे देखील भन्साळींच्या शॉर्ट टेम्परचे शिकार झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story