चाहत्यांना पूर्ण विश्वास आहे की, एजाज आणि पवित्रा यांच्यातील हा वाद लवकरच संपुष्टात येईल.

पवित्रा देखील एजाजसोबतच नातं अगदी मोकळेपणाने पुढे नेताना दिसली. याच दरम्यान या दोघांमधील नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

दोघं एकमेकांसोबत अधिक आनंदी दिसत आहे. दोघं एकमेकांसोबत लग्न करण्याचा विचार करत होते. एजाजच्या म्हणण्यानुसार, त्याला संपूर्ण कुटुंबाला एकत्र करायचा आहे.

बिग बॉस 14 मध्ये त्यांची जोडी तयार झाली. रिऍलिटी शोमध्ये दोघं भांडताना एकमेकांच्या प्रेमात पडले. शोमधून बाहेर पडल्यावर दोघांनी आपलं नातं कन्फर्म केलं.

आपल्या रिलेशनला पुन्हा ट्रकवर आणण्यासाठी दोघांकडून विशेष प्रयत्न घेतले जात आहे. एजाज आणि पवित्रा या दोघांनीही नात्यातील दुराव्याबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार, कपल त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या गैरसमजांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अस करतानाही ते संघर्ष करत आहेत.

एजाज आणि पवित्रा गेल्या 3 वर्षांपासून मालाडमध्ये एकत्र राहत आहेत. अजून ते एकमेकांपासून वेगळे झालेले नाहीत. पण हसत्या खेळत्या नात्यामध्ये प्रॉब्लेम सुरु झालेत.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, पावर कपलचं नातं मोडून त्यांच ब्रेकअप झालं आहे. मात्र ते अजूनही एकत्र राहत आहेत. दोघांच नातं सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.

एजाज-पवित्राचा ब्रेकअप?

टीव्ही वर्ल्डमधील एक बातमी समोर आली आहे. एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्या नात्यात दरार आली आहे. तणावातून यांच नातं जातंय.

VIEW ALL

Read Next Story