अमिताभ त्यांच्या चाहत्यांना अनवाणीच भेटतात कारण...

अमिताभ बच्चन यांनी स्वत: यामागील कारण सांगितलं आहे. पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत...

महानायक अमिताभ

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही.

वयाच्या 80 व्या वर्षी उत्साहाने करतात काम

अमिताभ हे वयाच्या 80 व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल इतक्या एनर्जी आणि उत्साहाने काम करतात.

अमिताभ यांची क्रेझ कमी झालेली नाही

अमिताभ यांच्या याच उत्साहामुळे मनोरंजन क्षेत्रात आल्यानंतर अनेक दशकं उलटल्यानंतरही त्यांच्याबद्दलची चाहत्यांमधील क्रेझ कमी झालेली नाही.

लोकप्रियतेची कल्पना यावरुनच येते

अमिताभ यांची लोकप्रियता आणि चाहत्यांमधील क्रेझ पहायची असेल तर रविवारी मुंबईमधील जुहू येथील अमिताभ यांच्या 'जलसा' या बंगल्याबाहेर जावं असं म्हटलं जातं.

'जलसा'बाहेरची गर्दी

असं म्हणण्यामागील कारण म्हणजे अमिताभ यांना भेटण्यासाठी दर रविवारी न चुकता शेकडो चाहते 'जलसा'बाहेर गर्दी करतात.

घरी असतात तेव्हा चाहत्यांना आवर्जून भेटतात

विशेष म्हणजे अमिताभ ज्या ज्या रविवारी घरी असतात तेव्हा आवर्जून या चाहत्यांची भेट घेतातच.

पोडियमवर येऊन करतात नमस्कार

अमिताभ त्यांच्या बंगल्याच्या गेटजवळ असलेल्या एका पोडियमवर येऊन आपल्या चाहत्यांना नमस्कार करुन त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतात.

चाहत्यांना अनवाणीच भेटतात

मात्र चाहत्यांना भेटायला येताना अमिताभ हे कधीच पायात चप्पल किंवा शूज घालत नाहीत. मात्र असं अनावणी चाहत्यांना भेटण्यासाठी येण्यामागे एक खास कारण असल्याचं अमिताभ सांगतात.

अनेकांनी विचारला हा प्रश्न

अनवाणी येऊन बंगल्याच्या गेटवर चाहत्यांना अभिवादन करण्यासंदर्भात अनेकदा विचारण्यात आल्याचं अमिताभ यांनी नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अमिताभ यांनी सांगितलं कारण

आपण असं का करतो याबद्दल अमिताभ यांनी, "हो मी चप्पला न घालता चाहत्यांना भेटतो. तुम्ही मंदिरामध्ये अनवाणीच जाता ना? रविवारी भेटायला गर्दी करणारे माझे हिंतचिंतक हे मला एखाद्या मंदिराप्रमाणेच आहेत. आता तुम्हाला यासंदर्भात काही अचडणी नसावी," असं इन्स्ताग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

VIEW ALL

Read Next Story