चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडलीये. 

Updated: Mar 10, 2017, 10:53 AM IST
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या title=

विरार : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडलीये. 

महिन्याभरापूर्वीच या जोडप्याचे लग्न झाले होते. मात्र महिन्याभरातच त्यांचे खटके उडायला लागले. पत्नी मित्रांशी सोशल मीडियावरुन चॅट करत असे हे पतीला आवडत नसल्याने यावरुन त्यांच्या सतत वाद होत असतं. यातूनच ही हत्या झाली. सागर सांबरे असं या आरोपी पतीचं नाव आहे. 

या वादाने अखेर टोकच गाठले आणि यातूनच पतीने पत्नीला पेटवून दिले. त्यानंतर मात्र तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र ही हत्या असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केल्याने अखेर आरोपी पतीला अटक करण्यात आली. दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही.