मी जिवंत आहे... गळ्यात पाट्या बांधून मजूर आले कार्यालयात; जिवंत मजुरांना दाखवले मृत
सोमवारी शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे जेष्ठ नेते बळवंत मोरे, शेतकरी जेष्ठ नेते सुभाष लोमटे, कॉम्रेड साथी रामराव जाधव आणि शिवसेना आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वात मी जिवंत आहे. मेल्याचे प्रमाणपत्र द्या असे गळ्यात फलक लटकवून येत कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
वाघिणीच्या बछड्याचे 'आदित्य' नाव ठेणवण्यास मुनगंटीवारांचा विरोध; दानवे म्हणाले, 'तरीही आदित्य जास्त तळपत राहील'
Tigress calf Name Politics: 7 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातून एक आनंदाची बातमी समोर आली. यावेळी पांढरी वाघीण अर्पिताने पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्याच्या नामकरणावरून राजकारण होईल असे कोणाला अपेक्षित नव्हते.
तुमच्यावर ही वेळ आणणाऱ्या 'सजा'कारांना शिक्षा द्या- राज ठाकरे
Marathwada Muktisangram: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज ठाकरे यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दिवसेंदिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असे ते म्हणाले.
धक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
थेट मराठवाड्यात विशेष कॅबिनेट; मुख्यमंत्र्यांनी केल्या मोठ्या घोषणा
मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला. अनेक महत्वाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
राऊत नाही आले का? मराठवाड्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रश्न विचारल्यानंतर....
CM Eknath Shinde: खासदार संजय राऊत मराठवाड्यातील बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची चर्चा सुरु होती. खुद्द राऊतांनी यासंदर्भात विधान केले होते. दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना राऊत नाही आले का? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर उपस्थित सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. पुढे काय झाले ते जाणून घेऊया.
मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा
CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
संभाजी नगरमध्ये ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, इम्तियाज जलील आक्रमक
संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.
सरकारी जमिनीवरच शेत दाखवून पीकविमा उतरवला; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
सरकारी जमिनीवर पीक विमा उतरवून सरकारलाच चुना लावण्याचा प्रकार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात घडला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत आंदोलकांना सामोरं जाण्याचं पेललं शिवधनुष्य
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल 17 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची शिष्टाई यशस्वी ठरलीय. जालन्यातील लाठीचार्ज ते उपोषणाचा अखेरचा दिवस. एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला,
'ठरलंय तेवढं बोलायचं अन्...' CM शिंदेंनी जरांगेंसमोर पुन्हा तेच शब्द उच्चारले! पिकला जोरदार हशा
Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावर मनोज जरांगे-पाटील यांच्यासमोरच भाष्य केलं.
'मराठ्यांच्या नादी लागायचं काम नाही! ही वाघाची जात आहे, फाडून काढू'; जरांगेंच्या मुलीचा एल्गार
Maratha Reservation Manoj Jarange Patil Daughter Speech: आंदोलन शांतेत सुरु असताना तुम्ही तिथे येऊन लाठीचार्ज करता कारण तुम्हाला आंदोलन उठवायचं आहे. अरे जमणार नाही. ते आंदोलन उठणार नाही, असंही तिने म्हटलं आहे.
CM, DCM यांनी उपोषणस्थळी यावं; 12 तारखेला मराठ्यांचा विराट मोर्चा; मनोज जरांगेंची घोषणा
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 15 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दरम्यान, आज त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. जात बदनाम होऊ नये म्हणून दोन पावलं मागे घेत असल्याचं ते म्हणाले आहेत.
'राष्ट्रवादीचे असले तरी अजित पवार...' शिंदे, फडणवीसांबद्दल काय म्हणाले संभाजी भिडे
Sambhaji Bhide On Ajit Pawar: मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहोत असा शब्द संभाजी भिडे यांनी जरांगेंना दिला.
शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू; नांदेडमधील घटनेने एकच खळबळ
Nanded News Today: शेताला लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे आज आंदोलन मागे घेणार? मोठं विधान, म्हणाले 'महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हातात...'
सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ कशासाठी हवा आहे अशी विचारणा केली आहे. त्यातच आज दुपारी मराठा समाज आंदोलकांची बैठक पार पडणार आहे.
उपोषण मागे घ्यावं, सर्व पक्षीय बैठकीत ठराव... मनोज जरांगे म्हणतात 'दबावाला बळी पडणार नाही'
मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. जस्टिस शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच अंतरवाली सराटीत आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या तीन मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
कोपर्डी बलात्कार प्रकरणः तो कैदी मानसिक रुग्ण, आत्महत्येची चौकशी होणार
जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू शिंदे असे या आरोपीचे नाव असून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येरवडा कारागृहातील बराकीत गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केली आहे.
भर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा
मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दुसरीकडे जरांगे यांना राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतआहे.